अकोल्यात विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकूहल्ला

अकोल्यात विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकूहल्ला

प्रातिनिधीक फोटो

शुल्लक कारणावरुन दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन एका विद्यार्थ्यांने आपल्याच वर्गमित्रावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अकोल्यात घडली आहे. हल्ल्यात जखमी झालेला विद्यार्थ्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, त्या दोघांमध्ये इतक्या टोकाचे भांडण कशामुळे झाले? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तपासासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या शाळेत चौकशी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

दोन्ही विद्यार्थी अकोल्यातील गीतानगर येथील सेंट एन्स शाळेत शिक्षण घेत आहेत. या दोघांमध्ये कोणत्यातरी विषयावर वाद झाला. यातील एक विद्यार्थी पातूर भागाचा रहिवाशी आहे. तर दुसरा गंगाधर भागाचा रहिवाशी आहे. रिक्षात जास्त असताना गंगाधरचा रहिवाशी असणारा विद्यार्थी पातूरच्या विद्यार्थ्याला गंगाधरला घेऊन गेला. तिथे त्याने पातूरच्या विद्यार्थ्यांवर पातूरच्या विद्यार्थ्यावर चाकून पाच ते सहा वेळा वार केले आणि तिथून तो पसार झाला. या हल्ल्यात पातूरचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

First Published on: June 29, 2019 10:14 PM
Exit mobile version