पावसामुळे भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा पहिला सामना रद्द

पावसामुळे भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा पहिला सामना रद्द

पावसामुळे भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा पहिला सामना रद्द

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज धरमशाला येथे खेळविण्यात येणार होता. परंतु पावसाने ऐनवेळी हजेरी लावल्यामुळे सामना होऊ शकला नाही. न्यूझीलंड दौऱ्यात पत्करावा लागलेला दारूण पराभवानंतर पुन्हा नव्या जोमाने टीम इंडिया सुरूवात करणार होती.

करोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला असल्याने कोणीही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे काही क्रिकेटप्रेमींनी घरबसल्या क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पाऊस कोसळल्यामुळे सामना रद्द करावा लागला आहे. दुपारच्यावेळी खेळपट्टीची पाहणी करण्यात आली होती. परंतु खेळपट्टी खेळण्यायोग्य नसल्याचे दिसून आल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

First Published on: March 12, 2020 5:51 PM
Exit mobile version