पुढच्या ४८ तासांत जोरदार पाऊस; तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पुढच्या ४८ तासांत जोरदार पाऊस; तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

गेल्या आठवड्यात राज्याला झोडपून काढणारा पाऊस पुन्हा एकदा जोरदार आगमन करणार आहे. पुढच्या २४ ते ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

तीन जिल्ह्यांना अलर्ट

ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुंबईतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा – Happy Janmashtami 2020: जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत साजरा करा ‘जन्मोत्सव’!


 

First Published on: August 11, 2020 7:11 PM
Exit mobile version