हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही दलालांचे – चंद्रकांत पाटील

हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही दलालांचे – चंद्रकांत पाटील

हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही दलालांचे - चंद्रकांत पाटील

गेल्या दोन आठवड्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलनाला बसलेल्या देशभरातील शेतकऱ्यांविरोधात सत्ताधारी सातत्याने आरोप करत असताना प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना चक्क दलाल संबोधले. ते म्हणाले, सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत. पंजाबमध्ये बाजार समित्यांचा आठ टक्के कर बुडत असल्याने हे आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही तर दलालांचे आहे, असा आरोप त्यांनी केला. जे आंदोलन करत आहेत त्यांचे कमिशन बुडते आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, ‘मी पणनमंत्री असताना २०१७ साली कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन मुक्तीचा कायदा आणला होता. तेव्हाही १५ दिवस समित्या बंद पाडण्यात आल्या होत्या, पण सरकार हटले नाही. शेतकऱ्यांना त्यामुळे कुठेही माल विकण्याची मुभा मिळाली. म्हणून बाजार समितीचे उत्पन्न एकदमच बंद झाले असे होत नाही. ती व्यवस्थाही नव्या कायद्यात कायम ठेवण्यात आली आहे, हे समजून घेण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले.

अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. पंजाबमधूनच हे आंदोलन उभारले. कारण तेथे बाजार समित्यांचा आठ टक्के कर या कायद्यामुळे बुडणार आहे. पण शेतकऱ्यांना कुठेही दर मिळेल तेथे माल विक्री करण्यासाठी परवानगी दिली तर त्यात काय अडचण आहे? अशी विचारणा त्यांनी केली.


हेही वाचा – शेतकरी आंदोलन तीव्र होणार, सरकारचा प्रस्ताव अमान्य, देशभरात १४ तारखेला घेराव!


 

First Published on: December 9, 2020 7:06 PM
Exit mobile version