अंबरनाथमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. पाणी समजून रॉकेल प्याल्याने एका वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. कार्तिक सोनावणे असं या चिमुकल्याचे नाव आहे. दिवाळीसाठी कार्तिक पुण्यावरुन आजोळी आला होता. घरामध्ये खेळत असताना कार्तिकने पाणी समजून रॉकेल प्यायले. कार्तिकने रॉकेल प्यायल्याचे लक्षात येताच त्याच्या मामाने त्याला ताबडतोब खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान कार्तिकचा मृत्यू झाला.
कार्तिकने खेळता खेळता पाणी समजून रॉकेल प्यायले. घरच्यांच्या लक्षात येताच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र आज सकाळी त्याचा उपचारा दरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. मात्र कार्तिकच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कार्तिकचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे. डॉक्टरांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.