उल्हासनगर-विठ्ठलवाडी दरम्यान लोकलमधून पडून तरुण जखमी

उल्हासनगर-विठ्ठलवाडी दरम्यान लोकलमधून पडून तरुण जखमी

उल्हासनगर

गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. आज, सकाळी ७ वाजल्याचा सुमारास कल्याणहून अंबरनाथ येणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे. राकेश साकेत असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. साकेत उत्तर प्रदेशहून कल्याण रेल्वे स्थानकात आपल्या बहिणीसोबत आला होता. त्यानंतर त्यांनी अंबरनाथला येण्यासाठी कल्याणहून लोकल पकडली होती. मात्र लोकलमध्ये असलेल्या गर्दीच्या रेट्यामुळे तो विठ्ठलवाडी-उल्हासनगर स्थानकादरम्यान खाली पडला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी साकेतला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कळव्याच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मध्य रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मध्य रेल्वेकडून कोणतीही नवीन उपाययोजना होताना दिसत नााही. मध्य रेल्वे या अनेकदा उशिरा धावत असतात. त्यामुळे गर्दी आणखी वाढते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून अनेक मागण्या होत आहेत. पण अजून काहीही घडलेले नाही. मध्य रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. तसेच आणखी एक नवीन रेल्वे मार्ग सुरु करण्याची देखील गरज असल्याचे प्रवाश्यांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा –

‘चौकीदार चोर है’ वक्तव्यावरुन राहुल गांधींना कोर्टाचा समन्स

First Published on: August 30, 2019 7:51 PM
Exit mobile version