Night Curfew: जमावबंदीच्या वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची कारवाई

Night Curfew: जमावबंदीच्या वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीच्या जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले असून ते १५ एप्रिलपर्यंत असणार आहे. या जमावबंदीदरम्यान, पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी कायम आहे. यामध्ये नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे या नियमांचं पालन अनिवार्य आहे. मुंबईत देखील कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढत असल्याने मुंबईतही जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. याकरता रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. यावेळी मुंबईकर नागरिकांनी कोरोनाच्या नियमांसह जमावबंदीच्या आदेशाचं पालन केले नाही तर त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

राज्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आल्यानंतर मुंबईसह अनेक राज्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईत करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अनेक ठिकाणी रात्री नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच रॅश ड्राईव्हिंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरी जाण्यातं आवाहन करण्यात आले होते.

असे आहेत नवे निर्बंध


First Published on: March 29, 2021 9:55 AM
Exit mobile version