उल्हासनगर – ५ येथील साई कृपा चाळ या ठिकाणी राहणाऱ्या अरुण भानुदास साळुंखे (६४) यांचे स्वामी शांतीप्रकाश योगा केंद्राजवळ किराणा दुकान आहे. काल दुपारी १ वाजताच्या सुमारास ते दुकानात बसले असतांना दोन अज्ञात इसम त्यांच्या दुकानात आले. त्यांनी साळुंखे यांना आम्ही दोघे पोलीस असल्याचे सांगितलेय इतक्यात एक बनावट गिऱ्हाईक दुकानात आला आणि तुम्ही गुटखा आणि तंबाखू विकता का? असे विचारले इतक्यात दोन बनावट पोलिसांनी तुमच्या दुकानात गुटखा आणि तंबाखू असेल तर आम्हाला पंचनामा करावा लागेल असे सांगून पंचनामा सुरू केला, यावेळी साळुंखे यांना त्यांनी गळ्यातील सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या असा ५४ हजार रुपये किंमतीचे दागिने बाजूला काढून ठेवण्यास सांगितले. साळुंखे यांनी एका कागदाच्या पुडीत हे दागिने बांधले आणि ते ड्रॉवर मध्ये ठेवले. याआधी साळुंखे यांच्या नकळत बनावट पोलिसांनी तशीच पुडी ड्रॉवरमध्ये ठेवली होती. नंतर हातचलाखीने सोन्याचे दागिने असलेली पुडी काढून घेतली. जाताना पंचनामा करायचा आहे पोलीस ठाण्यात या असे सांगून साळुंखे यांच्या कानाखाली चापट मारली.