कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलासा दिला आहे. जनतेला तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशनदुकानावर मोफत उपलब्धता केली आहे. गरीब व गरजू लोकांना लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन दिले जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील रेशन दुकानांची यादी मोबाईल नंबरसह देण्यात आली आहे. शिवाय रेशनकार्ड नसले तरी लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याशिवाय उपासमारीची वेळ कुठल्याही कुटुंबावर येवू नये म्हणून एक फॉर्म रेशन दुकानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.