उल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची हत्या

उल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची हत्या

उल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची निर्घृण हत्या

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका विमल वसंत भोईर यांच्या मुलीची निर्घृण हत्याची केल्याची घटना समोर आली आहे. उल्हासनगर येथून जवळच असलेल्या हाजी मलंग वाडी परिसरात राहणाऱ्या वैशाली राजेंद्र पाटील (३२) या महिलेची तिच्या पतीने निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी राजेंद्र कृष्णा पाटील (४३) यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

नेमके काय घडले?

अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग वाडी परिसरात राजेंद्र कृष्णा पाटील हा शेतकरी त्याची पत्नी वैशाली राजेंद्र पाटील कुटुंबियांसह राहत होता. १० वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मात्र, काही दिवसांपासून राजेंद्र आणि वैशाली यांच्यात कौटुंबिक कारणांवरून भांडणे आणि वादविवाद सुरू होते. सततच्या वादाला राजेंद्र कंटाळला होता. सतत होणाऱ्या भांडणांचा राग त्याच्या डोक्यात होता. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वैशाली ही बेडरूममध्ये बसली होती. ही बसलेली असल्याचे राजेंद्रने पाहिले आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तिच्या डोक्यात, छातीवर आणि पोटात कोयत्याने अचानक वार केले. या घटनेत वैशाली गंभीर जखमी झाली आणि खाली कोसळली. तिला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले. मात्र, उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी राजेंद्र पाटील याने स्वतःला हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन केले. नेमक्या कोणत्या कारणावरून ही हत्या झाली हे अद्याप समजले नसून या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) खांदारे हे करीत आहेत

वैशाली पाटील हिचे वडील वसंत भोईर हे माणेरे गावचे माजी सरपंच असून आई विमल वसंत भोईर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना पक्षाच्या नगरसेविका आणि प्रभाग समिती सभापती आहेत.


हेही वाचा – बहिणीची हत्या करून भाऊ फरार


First Published on: July 20, 2019 5:28 PM
Exit mobile version