मुंबईकरांसाठी कल्याणकारी, नावीन्यपूर्ण व आधुनिक उपक्रम राबविणार -: मंत्री केसरकर

मुंबईकरांसाठी कल्याणकारी, नावीन्यपूर्ण व आधुनिक उपक्रम राबविणार -: मंत्री केसरकर

मुंबई -: मुंबई महापालिकेतील अनुभवी व तज्ज्ञ मनुष्यबळ आहे. मुंबईत कौशल्याची कमतरता नाही. या सर्वांची सांगड घालून मुंबई महानगराच्या विकासासाठी जे-जे नावीण्यपूर्ण, आधुनिक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांच्या कल्याणाशी जोडलेले उपक्रम राबवता येतील, ते हाती घेण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

मुंबई महानगराची पालक संस्था असलेल्या मुंबई महापालिकेचे कामकाज, पालिकेचे सुरू असलेले प्रकल्प आणि कल्याणकारी योजना आदींचा आढावा घेता यावा आणि भविष्यातील दिशा यादृष्टीने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त इकबाल चहल व संबंधित खात्याचे अधिकारी यांची महत्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी, पालिका आयुक्त इकबाल चहल व चार अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून महापालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच, सध्या प्रगतिपथावर असलेल्या योजनांचा आढावा देखील घेतला.

याप्रसंगी, भाजपचे आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, आशीष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त (दक्षता) अजीत कुंभार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

मुंबई महापालिका मुंबईकरांना विविध नागरी सेवासुविधा बहाल करते. मुंबईत राहणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, इतर वंचित घटक या सर्वांना योग्य स्थान मिळायला पाहिजे. त्यासाठी शिक्षण, रोजगार निर्मिती, आरोग्य या क्षेत्रांसह इतरही आवश्यक त्या सर्व क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ होण्यासाठी महापालिका व राज्य शासन यांच्यामध्ये दुवा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीन, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली.

पालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांनी महापालिकेची संक्षिप्त ओळख करुन दिली. त्यानंतर सर्व अतिरिक्त आयुक्तांनी क्रमाक्रमाने संगणकीय सादरीकरण करुन कामकाजाची माहिती पालकमंत्र्यांना करुन दिली.


सोवा व्हायरस करतोय ग्राहकांचे बँक अकाऊंट मिनिटात रिकामी; SBI चा ग्राहकांचा इशारा

First Published on: October 3, 2022 7:52 PM
Exit mobile version