डोंबिवलीत दोन तरुणींची आत्महत्या

डोंबिवलीत दोन तरुणींची आत्महत्या

प्रातिनिधीक फोटो

डोंबिवलीत दोन मैत्रिणींने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. ऋतुजा कोल्हे (१४) आणि वर्षा पाटील (२७) अशी या तरुणींची नावे आहेत. आत्महत्येच्या या घटनेमुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

डोंबिवली जवळील कोळेगाव येथे दोन तरुणींने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. कोळेगाव येथील श्री समर्थ कृपा या सोसायटीमध्ये चिंतामणी पाटील राहतात. वर्षा पाटील यांच्या घरी ऋतुजा आणि तिचा भाऊ हे दोघे दररोज झोपायला यायचे. या दोघींमध्ये वयाचे अंतर असले तरी देखील त्यांच्यात खूप चांगली मैत्री असल्याचे तेथील स्थानिक सांगतात. मंगळवारी देखील ऋतुजाचा भाऊ नेहमीप्रमाणे वर्षाच्या घरी गेला. तो घरी गेल्यानंतर त्याला धक्काच बसला. वर्षा पाटील हिच्या घरी वर्षा आणि ऋतुजा या दोघींनी एकाच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसेल. ऋतुजाच्या भावाने हा घडलेला प्रकार वर्षाचे वडील चिंतामणी पाटील यांना सांगितला. या दोघींना आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून मानपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.


वाचा – आठवीतल्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वाचा – बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर पीएसआयने केली आत्महत्या

First Published on: November 28, 2018 4:56 PM
Exit mobile version