कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा जल्लोषात मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्साहात आणि मोठ्या आनंदात गणरायाचे आगमन केले. विशेष म्हणजे यंदा उंच मूर्ती थाटात मंडळांमध्ये विराजित झाल्या आहेत. तसेच, या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.