भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवण्यात येत आहेत. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस देशात ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्याचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला केले आहे. दरम्यान ‘हर घर तिरंगा अभियानासाठी ध्वज निर्मिती कारखान्यांमध्येही विनाउसंत काम सुरु आहे. या कारखान्यांमध्ये झेंड्यांची निर्मिती वेगाने सुरु आहे.