उत्तर प्रदेशातील लखिमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्यांना गाडी खाली चिरडण्यात आल्याच्या घटनेचा निषेध आणि शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यातील सत्ताधारी आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. यासाठी आज महाराष्ट्रात सर्व अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद आहेत. तरी काही ठिकाणी नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंदला संपूर्ण महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळत आहे.
(छाया : दिपक साळवी)