जकार्तात सुरु असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी टीमने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय हॉकी टीमने श्रीलंकेचा २०-० ने पराभव करत सेमी फायनलमध्ये उडी मारली आहे. भारताचा साखळी फेरीतील हा पाचवा विजय आहे. २०० वा सामना खेळणाऱ्या रुपिंदर पाल सिंह आणि आकाशदीपने या सामन्यामध्ये भारतासाठी हॅट्रीक केली आहे.
FT| The Indian Men's Hockey Team showcase the full range of their strength in attack with a dominant performance against Sri Lanka in their final pool stage game of the @asiangames2018 that sees them score 20 goals on 28th August.#IndiaKaGame #AsianGames2018 #INDvSRI pic.twitter.com/6IygtaL1Ks
— Hockey India (@TheHockeyIndia) August 28, 2018
असा झाला सामना
भारतीय हॉकी टीमने आजच्या सामन्याची शानदार सुरुवात केली. पहिल्याच मिनिटामध्ये रुपिंदर पाल सिंहने गोल करत १-० स्कोर केला. चौथ्या मिनिटानंतर हरमनप्रीतने गोल करत स्कोर दुप्पट केला. त्यानंतर आकाशदीपने ९ व्या, ११व्या आणि १७ व्या मिनिटाला लागोपाठ गोल करत स्कोर ५-० केला. हरमनप्रीतने २१ व्या आणि आकाशदीप याने पुन्हा २२ व्या मिनिटाला गोल करत मध्यांतरापर्यंत ७-० असा स्कोर केला. या संपूर्ण सामन्यामध्ये मध्यांतरापर्यंत आकाशदीप सिंहने ४ गोल केले.
हॉकी टीमने ५ सामन्यात केले ७६ गोल
भारताच्या हॉकी टीमने पाच सामन्यांमध्ये एकूण ७६ गोल केले आहे. भारताच्या आकाशदीप सिंहने ६ गोल तर रुपिंदर पाल सिंह, हरमनप्रीत आणि मनदीप सिंहने प्रत्येकी ३ गोल केले आहेत. या व्यतिरिक्त उत्तरप्रदेशच्या ललित उपाध्यायने २, दिलप्रीत, अमित आणि विवेकने प्रत्येकी १ गोल केला आहे.