IND vs AUS : पुजाराने आक्रमकता दाखवणे गरजेचे; पॉन्टिंग, बॉर्डर यांची टीका 

IND vs AUS : पुजाराने आक्रमकता दाखवणे गरजेचे; पॉन्टिंग, बॉर्डर यांची टीका 

चेतेश्वर पुजारा

भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५० धावांची खेळी केली. मात्र, त्याने अर्धशतक करण्यासाठी १७४ चेंडू घेतले. पुजाराचे हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात संथ अर्धशतक ठरले. त्यामुळे पुजाराच्या फलंदाजीच्या शैलीवर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि अ‍ॅलन बॉर्डर यांनी टीका केली. ट्विटरवर एका चाहत्याने पॉन्टिंगला पुजाराच्या फलंदाजीविषयी विचारले. चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना पॉन्टिंग म्हणाला, पुजाराने योग्य पद्धतीने फलंदाजी केली नाही. त्याने फलंदाजीत अधिक आक्रमकता दाखवून धावांची गती वाढवली पाहिजे. तो संथपणे फलंदाजी करत असल्याने भारताच्या इतर फलंदाजांवर दडपण येते. याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतो.

First Published on: January 9, 2021 7:59 PM
Exit mobile version