35 वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड आमने-सामने

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाने 7 गडी राखून न्यूझीलंडचा पराभव केला. पाकिस्तानचा संघ 2009 नंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ 2014 नंतर प्रथमच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी उतरणार आहे. 2014 मध्ये भारतीय संघाला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्यफेरीचा सामना अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत 2 टी-20 सामने खेळले असून, दोन्ही जिंकले आहेत. 2016 मध्ये भारताने येथे ऑस्ट्रेलियाचा 37 धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी या विश्वचषकात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव झाला. (india vs england t20 wc 2022 2nd semifinal playing 11)

T20 मध्ये भारत आणि इंग्लंड 22 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने 12 सामने जिंकले, तर इंग्लंडच्या संघाने 10 सामने जिंकले आहेत. भारत आणि इंग्लंड संघ 1987 नंतर (35 वर्षांनंतर) प्रथमच जागतिक (ODI/T20) उपांत्य फेरीत आमने-सामने येणार आहे. दोन्ही संघ प्रथमच T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भिडणार आहेत. त्याशिवाय, दोन्ही संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोनदा (1983 आणि 1987) आमनेसामने आले आहेत. एक सामना भारताने तर एक सामना इंग्लंडने जिंकला होता.

T20 विश्वचषकात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने 2 सामने जिंकले, तर एका सामन्यात इंग्लंडचा संघ विजयी झाला. यावेळी दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी आमनेसामने आहेत. भारत आणि इंग्लंड दोनदा तटस्थ मैदानावर आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत.

या वर्षीच्या T20 मधील दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर भारताने यावर्षी (2022) या फॉरमॅटमध्ये 37 सामने खेळले आहेत. यापैकी भारतीय संघाने 27 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ 9 सामन्यांत पराभूत झाला आहे. एक सामना अनिर्णित राहिला.

इंग्लंड संघाबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षी 25 टी-20 सामने खेळले आहेत आणि 13 जिंकले आहेत. इंग्लंडच्या संघाला 11 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. एक सामना निष्फळ ठरला.

यावर्षी भारत आणि इंग्लंड संघ 3 टी-20 सामने आमने-सामने आले आहेत. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात तिन्ही टी-20 सामने खेळले गेले. भारताने ही मालिका 2-१ ने जिंकली. म्हणजेच भारताने 2 सामने जिंकले आणि इंग्लंडने 1 सामना जिंकला.

वनडे आणि टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ एकूण 11 वेळा आमने-सामने आले आहेत. यातून दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा निर्माण झाली आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामने जिंकले आहेत. 1 सामना बरोबरीत आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये 8 सामने खेळले गेले. त्यापैकी 3 सामने भारताने तर 4 सामने इंग्लंडने जिंकले. 2011 च्या विश्वचषकात दोघांमधील सामना बरोबरीत सुटला होता.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी या विश्वचषकात आतापर्यंत प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत. जिथे भारतीय संघाने 4 सामने जिंकले आणि एकात पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ दुसऱ्या गटात 8 गुणांसह अव्वल स्थानी राहिला. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघाला 5पैकी 3 सामने जिंकता आले. आयर्लंडविरुद्ध संघाला अपसेटचा सामना करावा लागला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला.

दोन्ही संघांची ताकद आणि कमकुवतपणा

भारताची ताकद

भारताची कमजोरी

इंग्लंडची ताकद

इंग्लंडची कमजोरी

या विश्वचषकामध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत पाच सामन्यात 123 च्या सरासरीने आणि 138.98 च्या स्ट्राईक रेटने 246 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात वेगळ्या शैलीत फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचा इंग्लंडला सर्वात मोठा धोका असेल. सूर्यकुमारने या विश्वचषकात पाच सामन्यांत १९३.९७ च्या स्ट्राईक रेटने २२५ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार आणि सॅम करणची टक्कर पाहायला मिळते.

त्याशिवाय गोलंदाजीत इंग्लंडकडून सॅम कुरन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने चार सामन्यांत 10 विकेट्स घेतल्या आहेत. मार्क वुडने चार सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, त्याच्या खेळावर प्रश्नचिन्ह आहे. अर्शदीप सिंगने भारतासाठी घातक गोलंदाजी केली आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामन्यांत 10 बळी घेतले आहेत.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

भारतीय संघ : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत/दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल/युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.


हेही वाचा – सूर्याच्या फलंदाजीने मी खूप प्रभावित झालो पण…; एबीडीने दिला महत्त्वाचा सल्ला

First Published on: November 10, 2022 9:08 AM
Exit mobile version