रोहित शर्मा भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार असला पाहिजे – गंभीर 

रोहित शर्मा भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार असला पाहिजे – गंभीर 

रोहित शर्मा

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने यंदा पाचव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. मुंबईने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. कर्णधार रोहितने ६८ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच त्याने कर्णधार म्हणूनही पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित केले. पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा रोहित हा एकमेव कर्णधार आहे. याऊलट विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आता रोहितला भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार बनवण्याची वेळ आली आहे, असे गौतम गंभीरला वाटते.

 

First Published on: November 11, 2020 5:06 PM
Exit mobile version