कोकणातही वन्दे मातरम् सेवा सुरू करावी

कोकणातही वन्दे मातरम् सेवा सुरू करावी

कोकण रेल्वे मार्गावर वन्दे मातरम् आणि इंटरसिटी एक्सप्रेस सेवा (नवीन गाडी) सुरू करावी अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या संदर्भात निवेदन दिले आहे. भारतीय रेल्वेतील महाराष्ट्रात मध्य रेल्वेतील विभागलेल्या; कोकण रेल्वे सेवा ही अत्यंत महत्त्वाची आणि अधिकाधिक रेल्वे अर्थव्यवस्थेसह प्रवाशांच्या हिताची आणि खूपच लाभदायक सेवा आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, रोहा ते थेट मडगाव (गोवा) मेंगलोर (कर्नाटक) अशी कमी अंतराची कोकणपट्ट्यातील कोकण विभागातील कोकणवासीयांसाठी सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी सेवा मानली गेली आहे.

सध्या औद्योगिक आणि व्यवसायिक तसेच ग्रामीण भागातील सेवा विद्युतीकरणाबरोबर कोकण रेल्वे मार्गावरही विद्युतीकरण रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर मुंबई,दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा, पनवेल स्थानकातून दैनंदिन रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव आणि मेंगलोर पर्यंत कोकण रेल्वे सेवा देत प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही बाबतीत उपयुक्त ठरली आहे. विद्युतीकरणाने कोकण रेल्वे सेवा जलद आणि सुरक्षित झाल्यामुळे सध्याच्या सेवेत कोकण रेल्वे मार्गावर वंदे मातरम् एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांची नवीन सेवा मिळावी, अशी मागणी संघाचे प्रमुख राजू कांबळे आणि अध्यक्ष सुजित लोंढे यांनी केली आहे.

First Published on: May 16, 2023 10:24 PM
Exit mobile version