GoodNews! ठाण्याची पाणी कपात होणार रद्द!!

GoodNews! ठाण्याची पाणी कपात होणार रद्द!!

नेहमी ठाणेकरांना असणारी पाणी कपातीची चिंता लवकरच दूर होणार आहे. गेल्या आठवड्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आता ठाण्यावर निर्माण झालेले पाणी कापतीचे संकट टळले आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे ठाण्याच्या काही भागात झालेली पाणी कपात रद्द होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली असून मुंबई महापालिकेकडून एकूण होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात आलेले १३ एमएलडी पाणी पुन्हा मिळणार असून ठाण्याचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

जून आणि जुलै महिन्‍यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता . त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात फक्त ३४ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध होता परिणामी भविष्यातील गरज ओळखून मुबई महापालिकेने २० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या पाणी कपातीच्या निर्णयामुळे ठाण्यातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्यास सुरुवात झाली होती.


पाणी कपात मागे घ्या; जनता दलाची मागणी


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला दररोज ६५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र मुंबई महापालिकेनेच त्यांच्या क्षेत्रात २० टक्के पाणी कपात केली असल्याने ठाण्याला मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये १३ टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. त्यामुळे ठाण्याला ५ ऑगस्ट पासून केवळ ५२ एमएलडीच पाणी पुरवठा होता.

गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी पाणी कपात रद्द

गेल्या दीड आठवड्यपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आता पाणी कपातीचे संकट दूर झाले असून गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी पाणी कपात रद्द होणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांना मात्र उत्सवाच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. ठाण्यातील या भागात होणार पाणी पुरवठा पूर्ववत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on: August 18, 2020 9:56 PM
Exit mobile version