विधानसभा निवडणुकीत आरपीआयला (आठवले गट) अपेक्षित १० जागा न दिल्याने आपण भाजपवर नाराज आहोत. मात्र, सद्यस्थितीत सक्षम पर्याय नसल्याने हाती कमळ घेतले असल्याच्या शब्दांत पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी भाजपवर आगपाखड केली. नाशिक दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. आठवले यांनी १० जागांची मागणी केली होती, मात्र भाजपने केवळ ५ जागाच दिल्या. यावरुन आठवले चांगलेच दुखावले गेल्याचे यानिमित्ताने पुढे आले.