कामाची वेळ पाळा नाहीतर २०२४मध्ये मोदींचं सरकार येईल, केतकरांनी टोचले काँग्रेसच्या नेत्यांचे कान

कामाची वेळ पाळा नाहीतर २०२४मध्ये मोदींचं सरकार येईल, केतकरांनी टोचले काँग्रेसच्या नेत्यांचे कान

काँग्रेसने डोंबिवलीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ‘हात जोडो अभियान’ या एका पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह स्थानिक नेते मंडळी तब्बल अडीच तास उशिरा पोहोचले होते. या कार्यक्रमास खासदार कुमार केतकर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कुमार केतकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे कान टोचले.

कुमार केतकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा पक्ष आहे. हे दोन्ही नेते कुठल्याही कार्यक्रमाला कायम वेळेवर पोहोचायचे.

पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची लोकप्रियता नक्कीच नाना पटोले आणि कुमार केतकर यांच्यापेक्षा जास्त होती. तरीदेखील ते प्रत्येक ठिकाणी वेळेवर यायचे. त्यामुळे यापुढे कायम वेळ पाळावी लागेल. नाहीतर २०२४ मध्ये मोदींचं सरकार येईल आणि त्यांच्यानंतर आपण दोन तासांनी पोहोचू, असं म्हणत केतकर यांनी नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांचे कान टोचले.

२०२४ची निवडणूक आपल्याला जिंकायची असेल तर टाईम टेबलचा घोटाळा करून चालणार नाही. ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या शपथा घेतल्या ते सगळे काँग्रेस पक्ष सोडून गेले. आपल्यापैकी कुणी सोडून गेलं नाही, असंही केतकर म्हणाले.


हेही वाचा : संसद भवनाच्या ऐतिहासिक कामामुळे विरोधकांना पोटदुखी, मुख्यमंत्री शिंदेंची टीका


 

First Published on: May 26, 2023 5:05 PM
Exit mobile version