धुक्यामुळे भीषण अपघात; लग्न सोहळा आटोपून परतणारे १३ जण जागीच ठार

धुक्यामुळे भीषण अपघात; लग्न सोहळा आटोपून परतणारे १३ जण जागीच ठार

धुक्यामुळे भीषण अपघात; लग्न सोहळा आटोपून परतणारे १३ जण जागीच ठार

पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीमध्ये धुक्यामुळे एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. धुपगुडी भागात बोल्डरने भरलेल्या ट्रक अनेक वाहनांना धडकला. या अपघातात १३ जणांचा जागी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाली आहेत. सध्या या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले?

मयनातलीच्या रस्त्याने धुपगुडीहून एक ट्रक बोल्डर (नदीचे दगड) घेऊन जात होता. त्यावेळेस ट्रक चालकाला धुक्यामुळे समोरील काही दिसेनासे झाले होते. यामुळे हा ट्रक समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना धडकला. या ट्रकची धडक इतकी भीषण होती की पुढच्या वाहनांचा अक्षरशः चेंदमेंदा झाला आणि ट्रक पूर्ण उलटला. या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचले असून या अपघाताचा अधिक तपास केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातातील लोकं लग्न सोहळा आटोपून माघारी परतत होते.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातमध्ये किती लोकांच्या मृत्यू झाला?, किती जण जखमी झाले? याची माहिती मिळाली नाही आहे. पण मृतदेह काढलेल्यांची संख्या १३ आहे. मृत्यूच्या आकड्यांप्रमाणे जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – सुरत – फुटपाथवर झोपलेल्या १८ लोकांना डंपरने चिरडले, १३ जणांचा मृत्यू!


 

First Published on: January 20, 2021 9:41 AM
Exit mobile version