मध्य प्रदेशमध्ये दलित शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीवरुन प्रियांका गांधी यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. गरीबांवर हल्ला, दलितांवर हल्ला, शेतकऱ्यांवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला हाच आहे भाजपाचा खरा चेहरा, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
“गरीबांवर हल्ला, दलितांवर हल्ला, शेतकऱ्यांवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला, हीच पाजपची पद्धत, चेहरा आणि चरित्र आहे. या अन्यायाविरोधात काँग्रेस निकराने लढा देईल,” असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.
गरीबों पर हमला
दलितों पर हमला
किसान पर हमला
लोकतंत्र पर हमलायही तो है भाजपा का चाल, चेहरा और चरित्र।
इस अन्याय के ख़िलाफ कांग्रेस जी-जान से लड़ेगी। pic.twitter.com/g3uU0Ad7gY
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 16, 2020
हेही वाचा – पायलट-गेहलोत लढाई न्यायालयात; नोटीसविरोधात याचिका दाखल करणार