जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

भारतीय लष्कराने बॅटच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू – काश्मीरच्या त्राल येथे सुरु असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.


जम्मू – काश्मिरच्या खोऱ्यात अजूनही गोळीबाराचे आवाज घुमत असून येथील त्राल सेक्टरच्या रेशी मोहल्ला येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. गेल्या १२ तासांपासून या परिसरात दोन्ही बाजूने चकमक सुरु आहे. त्रालमधील चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्राल सेक्टरमध्ये सोमवार सकाळपासूनच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाल्यापासूनच त्यांनी येथे सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. त्यांनतर सायंकाळी दहशतवाद्यांनी स्वतःला अडचणीत पाहून लष्करावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून दोनही बाजूंनी गोळीबार सुरु आहे. यामध्ये ४२ राष्ट्रीय रायफल्स, १८९ बटालियन सीआरपीएफ आणि एसओजी हे संयुक्तपणे दहशतवाद्यांचा सामना करत आहेत.

हेही वाचा –

अमेरिकेचा भारताला दणका; ट्रम्प यांचा मोठा निर्णय

औरंगाबादच्या खुलताबादमध्ये आणखी १ संशयित दहशतवादी अटकेत

First Published on: March 5, 2019 9:32 AM
Exit mobile version