भारतीय जवानांनी केलेले ‘हे’ कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

भारतीय जवानांनी केलेले ‘हे’ कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

भारतीय जवानांनी केलेले 'हे' कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

सध्या लडाखमधील नियंत्रण रेषेवरुन भारत आणि चिनी सैन्यांमध्ये तणाव सुरु आहे. मात्र, अशा परिस्थितही भारतीय लष्कराची माणुसकी दिसून आली आहे. भारतीय जवानांनी ३१ ऑगस्ट रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये नियंत्रण रेषा पार केलेल्या आणि भरकटलेल्या जनावरांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवले आहे. भारतीय जवानांनी केलेले हे कृत्य पाहून सर्वांच भारतीय लष्कराचा अभिमान वाटला आहे.

ट्विटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार; ‘भारतीय लष्कराने ३१ ऑगस्ट २०२० रोजी नियंत्रण रेषा पार करुन आलेल्या भरकटलेल्या १३ याक आणि चार वासरांना ७ सप्टेंबर रोजी चीनकडे परत सोपवले आहे. चिनी अधिकाऱ्यांनी याबद्दल भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत’.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींची ‘सरकारी कंपनी बेचो’ मोहीम; राहुल गांधींचा घणाघात


First Published on: September 8, 2020 5:28 PM
Exit mobile version