भारताकडून पाकचे तीन सैनिक ठार

भारताकडून पाकचे तीन सैनिक ठार

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्याने गोळीबार काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर जोरदार गोळीबार केला. पुँछमधील केजी सेक्टरमध्ये सकाळी 7 वाजता गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार केले.

भारतीय लष्कराचे नॅार्दन कमांडचे प्रमुख ले. जनरल रणबीर सिंह यांनी सांगितले की, काही दिवसांपासून पाकिस्तानाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु भारतीय लष्कर पूर्णपणे सर्तक असून घुसखोरीच्या प्रयत्नांना उधळून लावले आहे. तसेच पाकिस्तानचे नापाक कृत्याला कधीच यशस्वी होऊ देणार नाही अशी पाकिस्तानला तंबी सिंह यांनी पाकिस्तानला दिली.

पाकिस्तानच्या इंटर- सर्विसेज पब्लिक रीलेशन संस्थेने देखील पाकिस्तानच्या तीन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे कबूल केले आहे. परंतु या चकमकीत पाकिस्तानच्या सैनिकांकडून भारताचे पाच जवान शहीद झाल्याचा दावा केला. मात्र पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा भारतीय लष्कराने सांगितले.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाही पाकिस्तानने काश्मीरमध्ये भारताच्या सीमेवर प्रचंड गोळीबार केला होता. दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याच्या कुटील हेतूने हा गोळीबार करण्यात येत होता. मात्र भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यात काही दहशतवादी ठारही झाल्याचे सांगितले जाते.

First Published on: August 16, 2019 5:40 AM
Exit mobile version