अभिनेत्री दिव्या भारतीच्या वडिलांचे निधन, साजिद नाडियावालांनी केले अंत्यसंस्कार

अभिनेत्री दिव्या भारतीच्या वडिलांचे निधन, साजिद नाडियावालांनी केले अंत्यसंस्कार

अभिनेत्री दिव्या भारतीच्या वडिलांचे निधन, साजिद नाडियावालांनी केले अंत्यसंस्कार

दिवगंत अभिनेत्री दिव्या भारती हिचे वडिल ओम प्रकाश भारती यांचे निधन झाले आहे. ओम प्रकाश भारती यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ३० ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले मात्र सोमवारी बातमी समाजमाध्यमांवर सांगण्यात आली. दिव्या भारतीचा नवरा साजिद नाडियावाला याने तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, दिव्या भारती यांच्या निधनानंतर तिच्या आई वडिलांची संपूर्ण जबाबदारी तिचा नवरा साजिद नाडियावाला याने घेतली. वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत साजिद नाडियावाला त्यांच्या सोबत होता. दिव्या भारतीच्या वडिलांच्या निधनांनतर तिच्या आईची संपूर्ण काळजी देखील साजिद नाडियावालाच घेत आहे.

साजिद नाडियावाला दिव्याच्या आई वडिलांना स्व:च्या आईवडिलांप्रमाणे जपतो. त्यांना तो मॉम डॅड नावाने हाक मारतो. दिव्या आणि तिचे वडील आता या जगात नाही मात्र साजिद तिच्या आईची काळजी घेतोय. दिव्या भारतीचा गॅलरीतून पडून मृत्यू झाला होता मात्र तिचा मृत्यू हा खून असल्याचे म्हटले जाते होते. साजिद नाडियावाला याच्यावर देखील खूनाचा आरोप करण्यात आला होता मात्र पोलिसांनी दिव्या भारतीचा मृत्यू अपघाती मृत्यू म्हणून घोषित केला.


दिव्या भारती आणि साजिद नाडियावाला यांच्या लग्नाने बॉलिवूडला चांगलाच धक्का बसला होता. दिव्या भारती आणि साजिद नाडियावाला यांनी गपचूप लग्न केले होते. दिव्या भारती १६ वर्षांची असताना तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते आणि अवघ्या १९ व्या वर्षी हे जग सोडून गेली. ‘शोला और शबनब’ या सिनेमाच्या सेटवर तिची ओळख साजिद सोबत झाली आणि दोघेही प्रेमात पडले. दिव्या १९९२साली दिव्या १८ वर्षांची असताना तिने साजिद सोबत लग्न केले. या काळात तिच्या समोर तिचे करियर आणि अनेक संधी वाट पाहत होत्या मात्र तिने लग्न करण्याचे ठरले. तिच्या लग्नानंतर बॉलिवूडला चांगलाच धक्का बसला होता.

एका मुलाखतीत दिव्याच्या आईने दिव्या आणि साजिद यांच्या लग्नाविषयी सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या, शोला और शबनब सिनेमाच्या निमित्ताने त्यांचे सतत सेटवर येणं जाणं होतं. तिथेच त्यांची साजिद सोबत ओळख झाली होती. एक दिवस दिव्यामे त्यांना ‘साजिदच्या बाबतीत आई तुझे काय विचार आहेत’, असे मला विचारले त्यावर मी ‘चांगला आहे’ म्हटले होते. काही दिवसानंतर तिने ‘मी साजिदशी लग्न करू’ असे विचारले तेव्हा मी तिला ‘हा प्रश्न तुझ्या वडिलांना विचार’ असे सांगितले. मात्र तिच्या वडिलांनी दोघांच्या लग्नाला दिला.

एकदिवस दिव्या भारतीने घरी फोन करुन मी साजिद सोबत लग्न करत असून विटनेस म्हणून तुम्हाला यावे लागेल असे सांगितले. मी लग्नाला गेले नाही आणि दिव्याला देखील वडीलांना याबाबत काही न सांगण्याची ताकीद दिली. दोघांनी लग्न केले आणि त्यानंतर दिव्या आमच्याच घरी राहत होती. एकदा दिवाळीच्या मुहूर्तावर साजिद आणि दिव्याने मिळून तिच्या वडिलांना त्यांचे लग्न झाल्याचे सांगितले.


हेही वाचा – Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात बोल्ड अन् ग्लॅमरस निथा शेट्टीची एंट्री

First Published on: November 1, 2021 3:59 PM
Exit mobile version