Sushant Suicide: आरोप सिद्ध न झाल्यास ‘पद्मश्री’ परत करणार- कंगना

Sushant Suicide: आरोप सिद्ध न झाल्यास ‘पद्मश्री’ परत करणार- कंगना

बॉलिवूडची क्विन कंगणा राणावत

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबद्दल कंगना राणावतने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज दिग्दर्शक-निर्माते आणि कलाकारांवर निशाणा साधला आहे. सुशांतने बॉलिवूडमधील नेपोट‍िझममुळे आत्महत्या केली, असल्याचे कंगना म्हणाली होती. आता या आरोपांबाबत कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने असा दावा केला आहे की, जर तिला आपले आरोप सिद्ध करता आले नाहीत तर ती सरकारने दिलेला सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार पद्मश्री परत करणार आहे.

कंगना राणावतने एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबद्दल चर्चा केली. यावेळी ती असे म्हणाली की- ‘मुंबई पोलिसांनी मला बोलावले आणि मी त्यांना विचारले की मी मनालीमध्ये आहे आणि तुम्ही कोणाला माझ्याकडे माझे निवेदन घेण्यासाठी पाठवू शकता, पण त्यानंतर मला काही उत्तर मिळालं नाही. मी सांगतेय की, मी असे काही बोलले असेल आणि ज्याची मी साक्ष देऊ शकत नाही, जे मी सिद्ध करु शकत नाही आणि जे लोकांच्या हिताचे नाही, तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन. कारण मी त्यास पात्र असणार नाही. आणि मी तशी व्यक्ती नाही, पण आतापर्यंत मी जे काही बोलले ते केवळ लोकहितासाठीच आहे.’

सुशांतच्या मृत्यूवर कंगना म्हणाली होती…

सुशांतच्या मृत्यूवर कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यात म्हटले की तो आत्महत्या करू शकत नाही, ही एक हत्या आहे. यावेळी कंगनाचा अर्थ असा नव्हता की कोणीतरी सुशांतची हत्या केली आहे, परंतु काही लोकांच्या दबावाखाली अभिनेत्याने आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. सुशांत वेगळा व्यक्ती आहे, असे जीवघेणा पाऊल तो कधीच उचलू शकत नाही असेही कंगनाने म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या वैद्यकीय अहवालानुसार तो डिप्रेशनमध्ये होता. याप्रकरणी पोलिसांनी बर्‍याच लोकांची चौकशी देखील केली असून अद्याप या प्रकरणाता तपास चालू आहे.


ऐश्वर्या राय बच्चन मुलीसह नानावटी रुग्णालयात दाखल

First Published on: July 18, 2020 12:39 PM
Exit mobile version