भीषण अपघातात पाच वारकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू

भीषण अपघातात पाच वारकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू

अहमदनगर येथे वारकऱ्यांच्या गाडीला अपघात

आषाढी एकादशी आधीच वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. अहमदनगर – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. स्कार्पिओ कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या अपघातामध्ये पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आाहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंढरपूरवरुन परतत असताना कर्जत तालुक्यातील पाटेवाडीजवळ ही घटना घडली.

कंटेनरची स्कार्पिओला धडक

पंढरपूरच्या विठ्ठू- माऊलीचे दर्शन घेऊन घरी परतत असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. अपघातामध्ये मृत्यू आणि गंभीर जखमी झालेले सर्व जण अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील खरवंडी गावचे रहविवासी आहेत. या अपघातामध्ये द्रौपदाबाई कातोरे, भाऊसाहेब मळोदे, रमेश कातोरे, दगडू भांगे आणि अंबादास डुचे यांचा जागीच मृत्यू झाला. तर १६ वर्षाचा सत्यम कातोरे हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यवार जामखेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत्यू झालेले रमेश कातोरे हे माध्यमिक शाळेत शिक्षक होते तर भाऊसाहेब मळोदे हे मुख्याध्यापक होते.

माय-लेकांचा दुर्देवी मृत्यू

रमेश कातोरे यांची आई द्रौपदाबाई या दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंढरपूरला वारीसाठी गेल्या होत्या. मात्र त्यांना हृद्यविकाराचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना आणण्यासाठी हे सर्व जण गेले होते. त्याठिकाणावरुन ते परत येत असताना कर्जत तालुक्यातील पाटेवाडीजवळ विरुध्द दिशेने जाणाऱ्या कंटेनरने स्कार्पिओला जोरात धडक दिली. त्यामध्ये माय-लेकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ऐवढा भीषण होता की, स्कार्पिओ गाडीचा चुरा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

First Published on: July 22, 2018 12:57 PM
Exit mobile version