आठवीपर्यंत बंद करण्यात आलेल्या परीक्षा सुरू, केरळ पॅटर्न राबवणार; दीपक केसरकरांची माहिती

आठवीपर्यंत बंद करण्यात आलेल्या परीक्षा सुरू, केरळ पॅटर्न राबवणार; दीपक केसरकरांची माहिती

मुंबई शहरात महिनाभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी येथे सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारकडून शिक्षण क्षेत्रात काही बदल करण्यात आले आहेत. राज्यातील शिक्षण विभागात आता केरळ पॅटर्न राबविण्यात येणार आहे. तसेच या संदर्भातील सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. आठवीपर्यंत बंद करण्यात आलेल्या सराव परीक्षा पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणार पण नापास करणार नाही, असं धोरण राबवलं जाणार आहे.

शिक्षण क्षेत्रात केरळने अनेक उपक्रम राबवले आहेत. यातील जे मॉडेल यशस्वी झाले आहेत, ते पुढे नेण्यात येणार असल्याचं केसरकर म्हणाले. केरळ आणि महाराष्ट्र अशी तुलना करता येणार नाही. केरळसोबत पंजाब आणि राजस्थानमधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत.

पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी लहान असतात, त्यामुळे त्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवले जणार आहे. तिसरीपासून पुढील इयत्तेसाठी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच आठवीपर्यंत कोणालाही नापास केलं जाणार नाही, असंही केसरकर म्हणाले.

मराठी विभाग जागतिक मराठी परिषदेचे आयोजन करणार असून मुंबईत ही परिषद होणार आहे. यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाची मदत घेतली जाणार आहे. जिथे मराठी बोलली जाते, त्या सगळ्या राज्यातील लोकांना एकत्र आणण्याचा आणि संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न असेल, असं केसरकर म्हणाले.


हेही वाचा : आदित्य ठाकरे उद्या बिहार दौऱ्यावर, तेजस्वी यादवांची घेणार सदिच्छा


 

First Published on: November 22, 2022 9:39 PM
Exit mobile version