“तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल” नाईकांचा आव्हाडांना फिल्मी स्टाईल टोला

“तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल” नाईकांचा आव्हाडांना फिल्मी स्टाईल टोला

"तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल" नाईकांचा आव्हाडांना फिल्मी स्टाईल टोला

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात सध्या कलगीतुरा सुरु आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या गणेश नाईक यांनी ठाण्यात राष्ट्रवादी पक्ष संपवला असा गंभीर आरोप केला होता. काल कोपरखैरणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळाव आयोजित केला होता. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांवर आरोप केले. नवी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला गणेश नाईक यांनी फिल्मी स्टाईल उत्तर दिले आहे. गणेश नाईक यांनी “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” असे हटके उत्तर दिले आहे.
“कोणीतरी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसीदेखील नाही. हिंमत असेल तर गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे घेऊन गुन्हा दाखल करा,” असे गणेश नाईक यांनी आव्हाडांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपांवर उत्तर देताना आव्हाडांना आव्हान दिले आहे. मुलगा संदीप नाईकचा बळी दिला नसल्याची पुष्टी गणेश नाईक यांनी यावेळी दिली. “आपण संदीपला निवडणूक लढ म्हणून सांगितले होते हे कार्यकर्त्यांना माहिती आहे,” असे गणेश नाईक म्हणाले.

काय म्हणाले आव्हाड ?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ठाण्यात गणेश नाईक यांनी पक्ष संपवला असा आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नवी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. त्यांनी मलाही संपवण्याचा डाव आखला होता, असा दावा देखील आव्हाड यांनी केला. गणेश नाईक यांच्यामुळे ठाणे- कल्याण- डोंबिवली- अंबरनाथ शहरांमध्ये पक्षाची ताकद संपली असे शरद पवार यांच्या निदर्शनास आणले होते. मात्र, पवार यांचा माझ्यापेक्षा जास्त नाईक यांच्यावर विश्वास होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
First Published on: March 9, 2020 12:40 PM
Exit mobile version