महाराष्ट्रात वीजबिल भरावेच लागणार, माफी नाहीच – ऊर्जामंत्री

महाराष्ट्रात वीजबिल भरावेच लागणार, माफी नाहीच – ऊर्जामंत्री

महाराष्ट्रात वीजबिल माफ केले जाणार नाही, वीजबिले भरावीच लागतील ( In Maharashtra electricity bills have to be paid – Energy Minister nitin raut)  असे ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी म्हटले आहे. जेव्हा जेव्हा केंद्र सरकार निर्णय घेईल तेव्हा राज्य सरकार त्याला समर्थन देईल. त्यानंतर जनतेला दिलासा देण्याचे काम करणार,असे नितिन राऊत यांनी म्हटले आहे. हवे तर सवलत दिली जाईल, मात्र वीजबिल माफ होऊ शकत नाही. सार्वजनिक कंपन्या चालवण्यासाठी पैसे लागतात. त्यामुळं वीज बिल भरावं लागेल,वीज बिल माफ करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे, केंद्र सरकारने मदत केली तर राज्य सरकारही पुढं येईल, असेही नितीन राऊत यांनी म्हटले होते.


हेही वाचा – बारावी परिक्षेच्या मुल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार, परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय

जारी

First Published on: June 11, 2021 10:54 PM
Exit mobile version