तेल शुद्धीकरण प्रकल्प बारसूत होण्याचे निश्चित, उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली बैठक

तेल शुद्धीकरण प्रकल्प बारसूत होण्याचे निश्चित, उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली बैठक

मुंबई : सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता नाणार ऐवजी बारसू (जि. रत्नागिरी) येथे होणार हे आता स्पष्ट झाले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत बैठक घेतली. या बैठकीत बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केले जाईल, अशी ग्वाही दिली.

नाणार आणि पंचक्रोशीतील नागरिक तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा विरोध यामुळे तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, राज्य सरकार प्रकल्प कोकणात होण्यावर ठाम होते. या पार्श्वभूमीवर आता सरकारने तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी बारसूची जागा निश्चित केली असून प्रकल्पाला चालना दिली आहे.

प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी होणारे भूसंपादन, पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, या प्रकल्पासाठी शिवणे, देवाचे गोटणे या गावांचे भूसंपादन होणार नाही. तर सोलगाव हे गाव कायमचे वगळण्यात येईल आणि या भागात आदर्शवत असे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल. या भागातील 70 ते 80 टक्के शेतकरी आणि स्थानिकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दाखविला आहे. या प्रकल्पाबाबत असलेले जनतेचे गैरसमज दूर केले जातील. याशिवाय जमिनीच्या दराबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. तसेच एकूण पॅकेजची माहिती शेतकऱ्यांना, स्थानिकांना देण्यात येईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

बारसू येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी एकूण 6 हजार 200 एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी 2 हजार 900 एकर जमीन संपादित करण्यात आली असून या प्रकल्पामुळे दोन लाख कोटींची थेट गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत, अशी माहिती सामंत यांनी दिली.

आजच्या बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

First Published on: November 22, 2022 9:50 PM
Exit mobile version