येत्या दोन-अडीच वर्षांत मुंबईचा कायापालट होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

येत्या दोन-अडीच वर्षांत मुंबईचा कायापालट होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाविकास आघाडी सरकारच्या काळाता महाराष्ट्राचा विकास किती झाला हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य धाडसी नेतृत्वामुळे आम्हाला या राज्याची आणि मुंबईची त्यातून सुटका करण्याची संधी मिळाली. (Mumbai will be transformed in the next two and a half years Chief Minister Eknath Shinde)

मी जेव्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदीं बघतो आणि त्यांना भेटतो तेव्हा माझ्या मानात एक पवित्र भावना जागी होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही खास आहे, जे आम्हाला विश्वास आणि उर्जा देते. मुंबईकरांचं जगणं सुसय्य करण्याची सुरूवात खऱ्या अर्थाने आज झाली आहे. येत्या दोन अडीच वर्षात या मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसाची सुरूवात सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशी ठरेल.


हेही वाचा – नवीन संसद भवनातील लोकसभेचे सभागृह तयार; अर्थसंकल्प इथेच मांडणार?

First Published on: January 19, 2023 5:43 PM
Exit mobile version