माय महानगर विशेष : जाणून घ्या, ‘तिरंग्या’बद्दलची विस्तृत माहिती

माय महानगर विशेष : जाणून घ्या, ‘तिरंग्या’बद्दलची विस्तृत माहिती

भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रध्वज अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रध्वज हा भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय ध्वज खादी (महात्मा गांधींमुळे प्रसिद्ध झालेल्या व हाताने कातलेल्या) नावाच्या विशिष्ट प्रकारच्या कापडापासून बनवला जातो. स्टँडर्ड ब्युरो ऑफ इंडिया त्याच्या बांधकाम आणि डिझाईनसाठी जबाबदार आहे. तर, खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाला त्याचे उत्पादन करण्याचा अधिकार आहे. 2009 मध्ये राष्ट्रीय ध्वजाची एकमेव उत्पादक कर्नाटक खादी ग्रामोद्योग संघटना होती. कोणत्याही खासगी नागरिकाने (कोणत्याही राष्ट्रीय दिवशी वगळता) राष्ट्रध्वज वापरण्यास सक्त मनाई होती. तर, 2002 मध्ये नवीन जिंदाल यांच्या विनंतीवरून भारत सरकारने (भारताचे केंद्रिय मंत्रिमंडळ) ध्वजाच्या मर्यादित वापराचा कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बदलला. ध्वजाच्या अतिरिक्त वापरासाठी 2005 मध्ये तो हा कायदा पुन्हा बदलण्यात आला. भारतीय ध्वज तीन रंगात असल्यामुळे त्याला तिरंगा म्हणतात. खादी फॅब्रिक, मध्यभागी वर्तूळ आणि तीन रंगांचा वापर करून भारतीय ध्वज क्षितिजाच्या समांतर तयार केला आहे. 22 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वातंत्र्याचा परिणाम म्हणून राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. त्याची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर अनुक्रमे 2 : 3 आहे. स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून भारतीय ध्वज तयार केला आणि स्वीकारला गेला. आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास आणि निर्मितीचा घेतलेला हा मागोवा…

अशी मिळाली राष्ट्रध्वजाला मान्यता

भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय नागरिकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज राष्ट्राबद्दलच्या आपल्या अभिमानाचे प्रतीक आहे. भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी स्विकारला गेला. २४ मार्चला इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. २२ जुलै १९४७ रोजी या ठरावाला मंजुरी देण्यात आली. कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचे सार्वभौमत्व, वेगळेपण, अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारे प्रतीक असते. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी २२ जुलै १९४७ रोजी घटनासभेच्या बैठकीत तिरंग्याचा स्वीकार राष्ट्रीय ध्वज म्हणून करण्यात आला.

केशरी रंग

राष्ट्रध्वजाचा वरचा भाग केशरी आहे; जो त्यागाचे प्रतीक आहे. हा रंग देशाप्रती धैर्य आणि निःस्वार्थीपणा दर्शवतो. हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांसाठी हा अतिशय सामान्य आणि धार्मिक महत्त्वाचा रंग आहे. भगवा रंग वेगवेगळ्या धर्मातील लोकांच्या अहंकारापासून मुक्तता आणि त्याग दर्शवतो आणि लोकांना एकत्र करतो. केशरी रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे, जे आपल्या राजकीय नेतृत्वाला आठवण करून देते की, त्यांच्याप्रमाणेच आपणही काही वैयक्तिक लाभ दूर ठेवत संपूर्ण समर्पण वृत्तीने राष्ट्रहितासाठी कार्य केले पाहिजे.

पांढरा रंग

राष्ट्रध्वजाच्या मध्यवर्ती भागाची रचना पांढर्‍या रंगाने करण्यात आली आहे, जी राष्ट्राची शांतता, पवित्रता आणि प्रामाणिकपणा दर्शवते. भारतीय तत्त्वज्ञानानुसार पांढरा रंगदेखील शुद्धता आणि इमानदारी दर्शवतो. राष्ट्राला मार्गदर्शन करण्यासाठी ते सत्याच्या मार्गावर प्रकाश टाकते. हे भारतीय राजकीय नेत्यांना शांतता राखून मुख्य राष्ट्रीय उद्दीष्टय साध्य करण्याच्या दिशेने देशाचे नेतृत्व करण्याची आठवण करून देते.

हिरवा रंग

हिरवा हा तिरंग्याच्या तळाशी असलेला रंग आहे, जो विश्वास, उर्वरता, सुख, समृद्धी आणि प्रगती दर्शवतो. भारतीय तत्त्वज्ञानानुसार हिरवा हा उत्सव आणि दृढतेचा रंग आहे जो जीवन आणि आनंदाचे प्रतिनिधित्व करतो. संपूर्ण भारताच्या मातीतली हिरवाई दाखवते. हे भारतातील राजकीय नेत्यांना आठवण करून देते की, त्यांना भारताच्या मातीचे बाह्य आणि अंतर्गत शत्रूंपासून संरक्षण करायचे आहे.

अशोकचक्रातील २४ आरे काय दर्शवतात

12 आरे भगवान बुद्धांनी जी शिकवण दिली त्याचे प्रतिनिधीत्व करतात. तर, इतर 12 आरे हे त्यांच्या समतूल्य चिन्हांशी संबंधित आहेत जसे, अविध्या (म्हणजे ज्ञानाचा अभाव), सम्सकारा (म्हणजे आकार देणे), विजनाना (म्हणजे चेतना), नामरूप (म्हणजे नाव व स्वरूप), सदायातना (म्हणजे कान, डोळा, जीभ, नाक, शरीर आणि मन अशी सहा ज्ञानेंद्रिये), स्पर्श (म्हणजे संपर्क), वेदना, तृष्णा (म्हणजे तहान), उपदना (म्हणजे समज), भाव ( म्हणजे येणे), जाति (जन्म होणे), जरमर्ण (म्हणजे म्हातारपण) आणि मृत्यू.

कसे बदल झाले झेंड्यात 

ध्वज फडकवताना या गोष्टी विचारात घ्याव्यात

First Published on: August 8, 2022 8:56 PM
Exit mobile version