सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे यांचा खेळ होतोय मात्र जनता भरडली जातेय – प्रवीण दरेकर

सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे यांचा खेळ होतोय मात्र जनता भरडली जातेय – प्रवीण दरेकर

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची घोषणा केल्यावर लगेच राज्य सरकारने सांगितले की, अनलॉकचा विषय विचारधीन आहे. यामुळे राज्यातील जनतेमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षांमध्ये अंतर्गत बेबनाव व विसंवाद दिसून येतो. अंतर्गत समन्वय नसल्यामुळे यांचा खेळ होतोय, परंतु महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय असा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्य सरकारचा निष्काळजीपणा आणि एकूणच दिरंगाईमुळे आपण आरक्षण गमावून बसलो आहे असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

राज्य सरकारचा हा काय काल आणि आजचा बेबनाव नाही तर गेल्या दीड वर्षापासून अशाच प्रकारचा बेबनाव प्रत्येक गोष्टीवरुन होत आहे. काही गोष्टी पुढे येत आहेत तर काही येत नाही आहेत परंतु आता त्या गोष्टी प्रकर्षनाने बाहेर येत आहेत कारण विजय वडेट्टीवार या सरकारचा भाग आणि मंत्री आहेत. त्यांनी जाहीर केल्यानंतर श्रेयवादासाठी केलं का अनलॉक करण्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणुन भावना समजून त्यांनी असे केले का? हा जरी विषय असला तरी मुख्यमंत्र्यांनी लगेच काउंटर करण्याची आवश्यकता नव्हती त्याच्यामुळेच समन्वय राहिला नाही. एकाने केला की दुसरा करतो आणि दुसऱ्याने केले म्हणून तिसरा करतो आहे. यामुळे महाविकास आघाडीत कामकाजामध्ये बट्ट्याबोळ झालेला दिसतो आहे. राज्य सरकारमध्ये एकमेकांवर कुरघोड्यांचा खेळ होतो आहे परंतु त्याच्यामुळेच लोकं भरडली जात आहे असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण दिले होते. ते संविधानिक पद्धतीने हायकोर्टात टिकले आणि सुर्वोच्च न्यायालयात फेटाळले नाही त्याचे लाभही सुरु झाले होते. परंतु राज्य सरकारचा ढिसाळपणा प्रत्येक केसच्या वेळीचा दिरंगाईपणा आणि निष्काळजीपणामुळे आरक्षण गमावून बसलो. पदोन्नती मागासवर्गीयांच्या बाबतीत आहे. यासंदर्भात सरकारमध्ये असून उर्जामंत्री नितीन राऊत यांची भूमिका वेगळी आहे. सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेत नाही त्यामुळे तो विषयही तसाच ठेवला आहे असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाला बगल देण्याचं काम, दुर्दैवानं ह्या महाविकास आघाडी सरकारकडून होताना दिसतं असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे.

First Published on: June 4, 2021 3:09 PM
Exit mobile version