थोडं धैर्य ठेवा, तुम्ही लढा, सत्याचाच विजय होणार; राज्यपालांचं वानखेडे कुटुंबियांना आश्वासन

थोडं धैर्य ठेवा, तुम्ही लढा, सत्याचाच विजय होणार; राज्यपालांचं वानखेडे कुटुंबियांना आश्वासन

थोडं धैर्य ठेवा, तुम्ही लढा, सत्याचाच विजय होणार; राज्यापालांचं वानखेडे कुटुंबियांना आश्वासन

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्याने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर आरोप करताना दिसत आहेत. नवाब मलिक यांनी केलेले आरोप वानखेडे कुटुंबियांनी फेटाळले आहेत. मलिकांविरोधात काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात मानहानीचा दावा ठोकला होता. वानखेडे कुटुंबियांची नाहक बदनामी करत असल्याबद्दल सव्वा कोटींची नुकसान भरपाई याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने आज, मंगळवारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती वानखेडे, वडील ज्ञानदेव वानखेडे आणि बहीण यास्मिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. या भेटी दरम्यान राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्याची माहिती क्रांती वानखेडे यांनी माध्यमांना दिली.

क्रांती वानखेडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ‘आम्ही राजभवनावर रडायला गेलो नव्हतो. आम्ही आमचं निवदेन राज्यपालांना दिलं. ही एक सत्याची लढाई आहे. या लढाईत आम्हाला ताकदीची गरज आहे. त्या ताकदीचे आश्वासन आम्हाला राज्यपालांनी दिले.’

पुढे क्रांती म्हणाल्या की, ‘ज्या लोकांना असं वाटतं असेल हे लोकं गरीब बिचारे असं इकडून तिकडे फिरतायत. तसं नाही आहे. आम्ही योद्धा आहोत, सत्याचे योद्धा आहोत. आम्ही असंच लढत राहणार. आम्हाला राज्यपालांकडून चांगले आश्वासन निश्चित मिळाले आहे. स्फूर्ती मिळाली आहे. आम्ही जास्तीत जास्त सत्यासाठी निश्चित लढणार आहोत आणि विजय आमचाच होईल.’

‘कुठलेही पुरावे न दाखवता कोणत्याही स्तराला जाऊन आमच्या कुटुंबियातील सदस्यांवरील इज्जत अब्रुवर हल्ला केला जातोय. या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या. काही नाही थोडं धैर्य ठेवा, तुम्ही लढा, सत्याचाच विजय होणार, असा सकारात्मक प्रतिसाद राज्यपालांकडून मिळाला आहे. पुढे काय होत ते पाहूयात,’ असं क्रांती म्हणाल्या.


हेही वाचा – फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा हायड्रोजन बॉम्ब आता मी टाकणार, नवाब मलिकांचा पलटवार


First Published on: November 9, 2021 6:53 PM
Exit mobile version