‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अर्णब गोस्वामीला घेऊन पोलीस अलिबागला रवाना झाले आहेत. सकाळी २४ पोलीस अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचले आणि अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेतेले आहे. गोस्वामी यांचा फोन देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घरातून उचलले. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता पमवेल पोलिसांनी कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे.
Screenshots of Republic TV channel showing Mumbai police entering Arnab Goswami’s residence and what appears to be a scuffle inside https://t.co/wUlFrNX108 pic.twitter.com/3kmnUy81BP
— ANI (@ANI) November 4, 2020
हेही वाचा – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण: आमदार प्रताप सरनाईक यांचा १५ ऑगस्टला सत्याग्रह