IND vs WI : भारताचा 88 धावांनी विजय; फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडिज ठरली फेल

IND vs WI : भारताचा 88 धावांनी विजय; फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडिज ठरली फेल

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने 4-1 ने वेस्ट इंडिजवर मात केली आहे. भारतीय संघातील फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर चेंडूचा मारा करत 100 धावांवर सर्वबाद केले. वेस्ट इंडिजचे सर्व फलंदाज फिरकीपटूंनी बाद करत सामना 88 धावांनी जिंकला. (India won by 88 runs against west indies in t20 final match)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 189 धावाचे आव्हान वेस्ट इंडिज समोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 100 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारताकडून 10 च्या 10 गडी हे फिरकीपटूंनी बाद केले. यामध्ये सर्वाधिक विकेट्से युवा रवी बिश्नोईने तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. भारताच्या फलंदाजीत श्रेयसचे अर्धशतक आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याची तुफानी खेळी महत्त्वाची ठरली.

अय्यरने 64 धावा केल्या असताना दीपक हुडाने त्याला 38 धावांची मदत केली. अखेरच्या षटकांमध्ये कर्णधार पांड्याने 28 धावांची तुफान खेळी खेळत भारताची धावसंख्या 188 पर्यंत नेली.

भारताने दिलेल्या 189 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर याने 56 धावांची तुफानी अर्धशतकी खेळी केली. मात्र, इतर खेळाडूंना फारशी चांगली खेळी करता आली नाही.


हेही वाचा –  CWG 2022 : ऑस्ट्रेलियाचा ‘सुवर्ण’ विजय, तर भारतीय संघ ठरला रौप्यपदकाच्या मानकरी

First Published on: August 8, 2022 9:01 AM
Exit mobile version