IND vs AUS : पंत बाद झाला नसता, तर भारतीय संघ जिंकला असता – वेंगसरकर

IND vs AUS : पंत बाद झाला नसता, तर भारतीय संघ जिंकला असता – वेंगसरकर

रिषभ पंत 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेली तिसरी कसोटी भारताने अनपेक्षितरित्या अनिर्णित राखली. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकण्यासाठी भारतासमोर ४०७ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसअखेर दोन विकेट गमावल्या होत्या. तर पाचव्या दिवशी दुसऱ्याच षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाला. मात्र, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, हनुमा विहारी आणि अश्विनच्या झुंजार खेळींमुळे भारताने हा सामना अनिर्णित राखला. भारताच्या सर्व खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद होती, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी ११८ चेंडूत ९७ धावांची खेळी करणाऱ्या पंतचे विशेष कौतुक केले.

First Published on: January 12, 2021 5:39 PM
Exit mobile version