कठीण परिस्थितीवर मात करून झाली ई-कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजिका

वैशाली स्वरुप या एक Entrepreneur आहेत. आज त्या एका कंपनीच्या founder आहेत, CEO आहेत. पण तुम्ही विचार करू शकत नाहीत की, त्यांच्या या यशस्वी प्रवासाआधी त्यांच्यावर एक वेळ अशी आली होती की, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी रेल्वेस्थानकाबाहेर पोहे, शिरा, दिवाळीत फराळही विकाला. तर दुसरीकडे, त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरत होत्या. पदरात एक मुल असताना त्यांनी एकदा रेल्वेखाली जीव देण्यापर्यंतचा विचार केला. पण यावेळी वडिलांच्या एका कॉलने त्यांचे आयुष्य बदलले. आज त्या ई-कचरा व्यवस्थापन आणि शुद्धीकरण या क्षेत्रात यशस्वी उद्योजिका म्हणून काम करत आहेत. आज माय महानगर मानिनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Entrepreneur वैशाली स्वरुप यांचीच ही Business motivational Journey सांगणार आहोत.

First Published on: September 27, 2022 7:00 AM
Exit mobile version