‘१५ मिनिटांचं राहू दे, तू ५ मिनिटांसाठी बाहेर ये’

‘१५ मिनिटांचं राहू दे, तू ५ मिनिटांसाठी बाहेर ये’

१५ मिनिटांचं राहू दे, तू ५ मिनिटांसाठी बाहेर ये - टी राजासिंग

तेलंगणाचा निवडणूक प्रचार आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची जीभ घसरली होती. त्यांनी प्रचारसभेत मोदींवर टीका करताना ‘चहावाल्या आम्हाला उसकवू नकोस. चहा-चहा ओरडताना लक्षात ठेवा की, मी एवढं मारेन की तुमच्या कानातून रक्त बाहेर येईल’, असं वादग्रस्त विधान केले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना तेलंगनातील भाजपचे उमेदवार टी राजासिंग यांनी ओवेसी यांना आव्हान दिले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ओवेसी बंधुवर टीका केली.

हेही वाचा – मोदींना राज्यघटनाच माहित नाही – ओवेसी

नेमकं काय म्हणाले टी राजासिंग?

गेल्या निवडणूकीत अकबरुद्दीन ओवेसी यांनी हिंदू-मुस्लिम समाजात तेढ वाढवणारे भाषण केले होते. या भाषणाला टी राजासिंग यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजासिंग म्हणाले की, तू १५ मिनिटांची गोष्ट करतोस, मी तुला ५ मिनिटांसाठीच बोलवतो. मी माझी सुरक्षा सोडतो, तू तुझी सुरक्षा सोड. तू एलबी स्टेडिएममध्ये ये, ५ मिनिटांची कबड्डी खेळू आणि मग पाहू, असे राजासिंग म्हणाले आहेत.

आरोप-प्रत्यारोपाची निवडणूक

सध्याची निवडणूक जी आहे ती फक्त आरोप प्रत्यारोपाची निवडणूक असल्याचे दिसत आहे. या प्रचारसभांमध्ये वैयक्तीक पातळीवर टीका केली जात आहे. सोमवारी अकबरुद्दीन ओवेसीने देखील अशीच एक टीका केली होती. त्याने तर मोदींना चक्क मारण्याची टीका केली होती. यावर आज भाजपचे उमेदवार टी राजासिंग यांनी ओवेसीला प्रत्युत्तर दिले आहे.


हेही वाचा – एवढं मारेन की कानातून रक्त येईल – ओवेसी

First Published on: December 4, 2018 5:14 PM
Exit mobile version