शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान सुधाराव – देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान सुधाराव – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेती क्षेत्रावर हवामान बदलाचा आणि किडीच्या प्रादुर्भावमुळे विपरीत परिणाम होत असून त्यामुळे कृषी उत्पादनात घट होत आहे. मात्र ड्रोन आणि कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ही परिस्थिती बदलता आल्यास त्याचा फायदा शेतीच्या शाश्वत विकासासाठी होईल, शिवाय शेतकऱ्याच्या जीवनमानात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सेंटरच्या माध्यमातून या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सेंटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्‌घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.


वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात धाडस नाही – राधाकृष्ण विखे पाटील


यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान बदलेल

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे हे केंद्र मुंबई येथे सुरु केल्यामुळे त्याचा उपयोग करुन घेण्यात महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. ड्रोन आणि कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा शेती आणि जलसिंचन क्षेत्रासाठी वापर करण्यात येईल. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमतेबरोबरच अचूक परिणाम साध्य करण्यास मदत देखील होणार आहे. कृषी क्षेत्रावर बदलत्या हवामानाचा दुष्परिणाम जाणवतो. सोबतच किडीच्या प्रादुर्भावाचा देखील कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम जाणवतो. अशावेळी ड्रोन आणि कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान वापरुन हवामानाची वेळीच माहिती आणि किडीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी आपण उपाय करु शकलो आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती क्षेत्र शाश्वत झाल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्याचे जीवनमान बदलण्यासाठी नक्कीच होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


वाचा – मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कारवाई होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


राज्यात भारत नेटच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतीपर्यंत फायबर ऑप्टीकल टाकण्यात येत असून त्याद्वारे प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटशी जोडण्याचा प्रयत्न केला जाता आहे. राज्यात २६ जानेवारी २०१९ पर्यंत अजून १० हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जातील. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरातून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणतानाच शेती क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.


वाचा – २०१९ ला २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकू – देवेंद्र फडणवीस


 

First Published on: November 29, 2018 3:37 PM
Exit mobile version