दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदतीबाबत अंतिम निर्णय

दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदतीबाबत अंतिम निर्णय

राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. सर्व नुकसानीची माहिती घेतली जात आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत. मात्र, येत्या दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल. शेतकरी व्यापारी यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्यांना नक्कीच मदतीचा हात दिला जाईल, असे आश्वासन उपमुखमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगलीतील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. या दौर्‍यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि केंद्राला देखील याबाबत माहिती दिली जाईल. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन देणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या विविध मागण्या आहेत. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करणार आहोत. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात चांगला समन्वय आहे. केंद्राकडूनही राज्याला मदत सुरू आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली, कोल्हापूर, रायगड, सांगली या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करतील. तळीये गावात सातार्‍यातील आंबेघर आणि मिरगावातही मोठे नुकसान झाले आहे. वायूदलाकडून जेवणाची पाकिटे वाटली जात आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

First Published on: July 27, 2021 5:20 AM
Exit mobile version