सांगली: गाडी विहिरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू

सांगली: गाडी विहिरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू

सांगली: गाडी विहिरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू

सांगलीतील आटपाडी तालुक्यातील झरे-पारेकरवाडी रोडवर वॅगनार कारचा भीषण अपघात झाला आहे. गाडीचं स्टेअरींग लॉक होऊन गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचं समोर येत आहे. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असताना ही घटना घडली आहे.

नक्की काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हातील चितळी येथील सहा जण जात होते. त्यावेळी पारेकरवाडी येथून जात असताना गाडीचं स्टेअरिंग लॉक झालं. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि थेट गाडी विहिरीत जाऊन कोसळली. विहिरीत पाणी जास्त असल्याने गाडीत असलेल्यांना बाहेर पडण्यास कोणताही मार्ग नव्हता. त्यातील एक जण हरिबा वाघमोरे हे गाडीची काच फोडून बाहेर आल्यामुळे त्याचा जीव बचावला आणि बाकी पाच जणांचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर झरे-पारेकवाडीतील परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पडलेल्या गाडीला जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली.

मृत व्यक्तीची नावं –
१) गुंडा डोंबाळे (वय ३५)
२) कुंडलीक बरकडे (वय ६०)
३) मच्छिंद्र पाटील (वय ६०)
४) शोभा पाटील (वय ३८)
५) संगीता पाटील (वय ४०)


हेही वाचा – बेळगावबाबत महाराष्ट्र आक्रमक भूमिका घेणार; मुख्यमंत्र्यांचा निर्धार!


 

First Published on: February 3, 2020 7:48 AM
Exit mobile version