गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सरासरी ६१.३३ टक्के मतदान झाले.
गडचिरोलीमध्ये ५ वाजेपर्यंत ६१.३३ टक्के मतदान झाले
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले आहेत.
एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोंदी येथे ही घटना घडली आहे
गडचिरोली-चिमूर येथील मतदान संपले आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी ७ ते ३ ही मतदान करण्याची वेळ देण्यात आली होती. त्यामुळे गडचिरोली-चिमूर येथील मतदान संपले असून आतापर्यंत १५ टक्के मतदान झाले आहे.
शंकरपूर गावाजवळ अपघात
गडचिरोलीमधील शंकरपूर गावाजवळ अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅकटर उलटून हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मतदार करुन परतणाऱ्या नागरिकांमधील तीन जणांचा यामध्ये अपघात झाला असून ९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra: Three people dead, 9 injured as a tractor overturned near Shankarpur village in Gadchiroli, today. The victims were returning to their village after casting their votes. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/VUOVGjdzJi
— ANI (@ANI) April 11, 2019