मध्यरात्री बोरघाटात भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

मध्यरात्री बोरघाटात भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर (Mumbai Pune Express Way) भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी आहे. मुंबईकडे येणाऱ्या दिशेने येणाऱ्या बोरघाटात (Borghat) झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला आहे.

हेही वाचा मुंबईत गोवरच्या ८ रुग्णांचा संशयित मृत्यू ; रुग्णांची संख्या दुप्पट

बोरघाटातून मुंबईकडे जाणाऱ्या आर्टीगा कारचा भीषण अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. मात्र, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी आहेत.

अब्दुल रहमान खान, (32 वर्षे, घाटकोपर), अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी, (रा.राजापूर, जि. रत्नागिरी), राहुल कुमार पांडे, (वय-30 वर्षे, कामोठे, नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गांडेकर, (23वर्षे अंधेरी, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. तर, मच्छिंद्र आंबोरे वय 38 वर्ष (चालक), अमीरउल्ला चौधरी, दिपक खैराल हे तिघे गंभीर जखमी आहेत.

हेही वाचा बदल्यांचे सत्र कायम : राममूर्ती एमएमआरडीएचे सहआयुक्त

अपघातामुळे बोरघाटात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे पोलिसांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून वाहतूकसेवा पूर्ववत केली.

First Published on: November 18, 2022 7:47 AM
Exit mobile version