म्हणून नवी मुंबईत आंदोलन पेटले

म्हणून नवी मुंबईत आंदोलन पेटले

मुंबईसह नवी मुंबईत हिंसक वळण

मराठा आरक्षणासाठी पुकारेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी दुपारी स्थगिती दिल्यानंतरही ठाणे, नवी मुंबईमध्ये या आंदोलनाचे पडसाद अजूनही जाणवत आहेत. अजूनही कळंबोळीमध्ये तणावाचे वातावरण असून, दगडफेक, जाळपोळ यासारख्या घटना समोर येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणतही आश्वासन न देताही हे आंदोलन का मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असा संतप्त सवाल आता संतप्त कार्यकर्ते आता विचारू लागलेत. त्यामुळे मराठा संघटनांना विचारात न घेता विरेंद्र पवार यांनी हा निर्णय घेतला असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान याबाबत आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे रायगड समन्वयक विनोद पोखरकर यांच्याशी बातचित केली असता त्यांनी हे आंदोलन कसे काय मागे घेण्यात आले. आता आंदोलन आमच्या हातात राहिले नसून परिस्थिती हाताच्या बाहेर निघाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची प्रतिक्रिया विनोद पोखरकर यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी समोर येवून चर्चा करावी

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी समोर यावे आणि चर्चा करावी अशी मागणी आता आंदोलक करू लागले असून, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावे असे विनोद पोखरकर यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. तसेच आता हे आंदोलन समाजाच्या हातात गेला असून, आम्ही जमावाला समजवण्यासाठी गेलो तरी पोलीस आमच्यावर लाठीचार्ज करत असल्याचा आरोप पोखरकर यांनी केला.

काय म्हणाले होते विरेंद्र पवार

या बंदमध्ये हिंसक प्रवृत्तीचा सहभाग असण्याची शक्यता असल्याचे सांगत या आंदोलना दरम्यान काही लोकांना त्रास झाला असल्यास त्यांची आम्ही माफी मागतो असे सांगत मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील आंदोलन स्थगित केल्याचे विरेंद्र पवार यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलकांनी शांतता राखावी असे आवाहन विरेंद्र पवार यांनी केले आहे.

तब्बल ६ तास रास्तारोको आणि पोलिसांचा गोळीबार

कळंबोळीमध्ये वातावरण एवढे तापले की कळंबोळीमध्ये आंदोलकांनी तब्बल ६ तास रस्तारोको केला. या दरम्यान तणावाचे वातावरण देखील पहायला मिळाले. कळंबोळीतील रास्तारोकोमुळे पुण्याकडे आणि कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.  दरम्यान कळंबोळीमध्ये जमावाने पोलिसांच्या दोन गाड्या फोडल्या तसेच दगडफेक देखील केली यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

First Published on: July 25, 2018 7:51 PM
Exit mobile version